Posts

Showing posts from 2016

Raja Dhale and Rajendra Gonarkar

Image
                     राजेंद्र गोणारकर आणि बौद्ध साहित्य आणि संकृतीचे गाढे अभ्यासक राजा ढाले                            साहित्य अकादेमी, मुंबई आयोजित एका कार्यक्रमात दि. 20/11/2016 

Book Releasing Ceremony of L. R. Balley's book entitled "Ambedkari Andonal ki Dastan"

Image
 दैनिक सकाळ , औरंगाबाद दि. 17 मे 2016  दैनिक दिव्य मराठी  , औरंगाबाद दि. 17 मे 2016 

धर्मांतराचे वैश्विक संदर्भ

Image
¨ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचे वैश्विक संदर्भ                            -डॉ. राजेंद्र गोणारकर     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आणि कृतीचे आकलन करतांना त्याचे  भारतीय संदर्भ जसे पहावे लागतात तद्वतच त्याचे वैश्विक संदर्भ देखील समजून घ्यावे लागतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले धर्मांतर ही भारतीय पातळीवर अभूतपूर्व अशी घटना होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत केलेले हे धर्मांतर भारतातील विषमतेला जन्म देणार्‍या  चातुर्वर्ण्यव्यवस्थेला दिलेले सडेतोड उत्तर होते. या धर्मांतराने पशूपेक्षा हीन मानल्या गेलेल्या अस्पृश्य समाजाला स्वाभिमानाचे जिणे दिले. व्यवस्थेने हजारो वर्ष त्याच्यापासून हिरावून घेतलेले त्याचे माणूसपण त्याला दिले . अल्पावधीत धर्मांतरीत बौद्धांनी केलेली प्रगती खचितच विस्मय वाटावा अशी आहे , म्हणूनच या धर्मांतराला  खूप मोल आहे.             धर्मांतर करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका स्फटिकासारखी स्पष्ट होती. व्यवस्थेत राहून व्यवस्थेच्या बदलाची अभिलाषा बाळगता येत नाही. पायाच चुकीचा असेल तर डोलार्‍याच्या डागडुजीने काम भागणार

दलित, विद्रोही कविताच खरी भारतीय कविता! Loknath Yashwant

Image
(डावीकडून राजेंद्र गोणारकर , ऋषिकेश कांबळे , कवी लोकनाथ यशवंत  व संजय घरडे)  दलित, विद्रोही कविताच खरी भारतीय कविता! - लोकनाथ यशवंत  वाशिम: पूर्वीच्या कविता हिंदुस्थानी होत्या. त्यामध्ये चंद्र, तारे, नदी, फुले, वारे यांच्या भावना व संवेदना उमटत होत्या; मात्र त्या कवितांमध्ये माणसांच्या संवेदनाचे प्रतिबिंब कुठेच दिसत नव्हते; परंतु दलित व विद्रोही कवितेने माणसाच्या जाणिवा आणि संवेदनाचे प्रतिबिंब साहित्यात उमटवले. म्हणूनच तीच खरी भारतीय कविता आहे, असे मत प्रसिद्ध कवी व साहित्यिक लोकनाथ यशवं त यांनी येथे व्यक्त केले. ३३ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशीच्या दुपारच्या सत्रात कवी लोकनाथ यशवंत यांची प्रकट मुलाखत डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. संजय घरडे आणि ऋषिकेश कांबळे यांनी घेतली. यावेळी लोकनाथ यशवंत यांनी सडेतोड उत्तरे दिली. बदलत्या काळात कवितेकडे कसे पाहता? या प्रश्नावर बदलत्या काळात कविताही बदलत आहे; परंतु आता सर्व जगात धर्म प्रभावी ठरत आहे. खरे तर धर्मातूनच आजचा दहशतवाद जन्माला आला आहे. मी तर म्हणतो माणसाला कोणत्याही धर्माची गरजच नाही. त्यांनी चार-पाच तत्त्व पाळाव
Image
                                    Dr. Rajendra Gonarkar
Image
Image
पीपल्स एज्यूकेशन सोसायटी (मुंबई )चे मिलिंद कला महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या वतीने दिला जाणारा 2016 चा 'मिलिंद समता पुरस्कार ' प्रख्यात विचारवंत डॉ. रूपाताई कुलकर्णी- बोधी यांना प्रदान करताना डावीकडून भंते डॉ. सत्यपाल , प्रा. पवार, प्रा. संतोष बुरकुल, डॉ. रूपाताई कुलकर्णी- बोधी, प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान , डॉ. राजेंद्र गोणारकर व डॉ. देसले .